Nana Patole | मुंबई : काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. काही महिन्यांपुर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड करुत उद्धव ठाकरे यांना सत्तेवरुन पायउतार केल होतं. याचपार्श्वभूमीवर नाना पटोलोंनी टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपचे लोक वारंवार वादग्रस्त विधानं करत आहेत. त्यामुळं महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेले आणि भाजपला पाठिंबा देणारे किंवा भाजपत असलेले खासदार आणि आमदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत कारण ते मोठ्या भय आणि भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
तसेच, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा गवगवा करायचा आणि एकीकडं भाजपनं त्यांना अपमानित करत असेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही ही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका आहे. कॉंग्रेस पक्षाची तर आहेच पण महाराष्ट्राची आहे, ही स्पष्ट भूमिका मी मांडतो असल्याचं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Navneet Rana | “…तर मला अभिमान वाटेल!”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाला नवनीत राणांची सहमती
- Jitendra Awhad | “जेम्स लेनचं समर्थन करणाऱ्यांची माफी म्हणजे…” ; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार!
- Hair Care Tips | हिवाळ्यामध्ये केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहात?, तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Aditya Thackeray | “…हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
- Vijay Deverakonda | अभिनेता विजय देवरकोंडा ED च्या धारेवर, तब्बल 12 तास चौकशी