सांगली : शिवसेना नेते संजय राऊत यांना झालेल्या अटकेवर बोलताना काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी देशात हुकूमशाही विरोधात देशाचा इतिहास कसा आहे याची आठवण करून दिली. देशामध्ये आता लोकशाही राहिले की नाही? असा प्रश्न उपस्थित होत असताना हुकूमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय हेतूने विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, निश्चितपणे हे देशाच्या लोकशाहीला घातक आहे, पण ज्यांनी ज्यांनी या देशावर जुलमी कारभार केला त्याच्या विरोधात मोठी लाट स्वातंत्र्य सैनिकांच्या रूपामध्ये उभी राहिली आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या रूपामध्ये हुकूमशाहीला नष्ट करण्याचे काम झालेलं आहे हा या देशाचा इतिहास आहे आणि या इतिहासाची निश्चितपणे पुनरावृत्ती होईल अशी आशा विश्वजित कदम यांनी बोलून दाखवली. सरकार विरोधात आवाज उठवला गेला की लगेच आवाज उठवणाऱ्या विरोधात केंद्रीय यंत्रणा कारवाई करतात हा नजीकचा इतिहास आहे.सोनिया गांधी,राहुल गांधी यांनाही टार्गेट केलं जातं.सातत्याने त्याना देखील चौकशीसाठी बोलावलं जाते. विरोधक शिल्लकच ठेवायचा नाही हा चंग सत्ताधाऱ्यानी बांधलेला दिसतो आहे, पण विरोधक शिल्लक न ठेवणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतोय की काय अशी भीती कदम यांनी बोलून दाखवली.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट
- Kirit Somaiya “आगे आगे देखो होता है क्या” ; संजय राऊतांच्या अटकेवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया!
- Rajan Vichare | “दिघे साहेब घात झाला… गद्दारीचा शिक्का बसला, छातीवर नाही पाठीवर वार झाला” ; राजन विचारेंचे भावूक पत्र
- Tushar Bhosale | संजय राऊत समस्त हिंदू समाजावर कलंक – आचार्य तुषार भोसले
- Sanjay Raut ED Inquiry | ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत आहे – प्रियांका चतुर्वेदी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<