मुंबई : येत्या २ वर्षामध्ये मुंबई शहरातले सर्व रस्ते खड्डे मुक्त करू अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास विभागाचे अडीच वर्ष मंत्री होते, तेव्हा का त्यांनी रस्ते खड्डे मुक्त केले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण नगरविकास विभागाचे अडीच वर्ष मंत्री होतात. राज्यातल्या सर्व नगरपालिका, महानगरपालिका हे सर्व आपल्या अधिपत्याखाली काम करत होते. त्या वेळेला मुंबई शहरातील रस्ते खड्डे मुक्त का नाही केले? हा प्रश्न मुंबईच्या नागरीकांच्या मनात निर्माण झालेला आहे. आज जेव्हा आपण अशा घोषणा करता, याचा अर्थ असा आहे की, आपण जेव्हा नगर विकास खात्याचे मंत्री होतात त्या कार्यकाळामध्ये मुंबईच्या विकासाठी तुम्ही काहीच केले नाही. ही त्याचीच कबुली आहे का?, अशी विचारणा महाराष्ट्रातली जनता करत आहेत”, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde । अक्कलकोट बस अपघातातील जखमींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्हिडिओ कॉल वरून केली विचारपूस
- Ravi Rana : “शिवसेनेचे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळणार, अन् शिवसेना भवनही… ”, रवी राणा यांचं मोठं भाकीत
- Urfi Javed | उर्फी जावेदने घातला गुलाबाच्या पाकळ्यांचा ड्रेस; चाहते झाले घायाळ | पहा VIDEO
- Ravi Rana : “संजय राऊत हे शरद पवारांचे नंदी, उद्धव ठाकरेंचं अस्तित्व बुडवूनच शांत बसतील”, रवी राणांचा हल्लाबोल
- Anand Dave : पवार साहेब यांनी आत्ता शिवचरित्र लिहावं आणि महाराजांना न्याय द्यावा – आनंद दवे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<