मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील सर्व महाविद्यालये आता १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच परीक्षाही ऑनलाईन घेण्यात येणार आहे. असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी जाहिर केले आहे. यावर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी टीका केली आहे. महाभकास आघाडीला ‘क्लास पेक्षा ग्लास’ महत्वाचा, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. दरम्यान, सदाभाऊ यांच्या टीकेवर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी उत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना पेडणेकर म्हणाल्या की,’सदाभाऊ खोत आणि माझी फारशी ओळख नाही. बार आणि शाळा यांचे साम्य दाखवणे ते अत्यंत मूर्खपणाचे लक्षण आहे. इतर राज्यांमध्ये जी नियमावली आहे, तीच महाराष्ट्रात असून Who च्या गाईडलाईननुसार एसोपी ठरतो. परत जुन्या कढीला उत आला आहे’, असे पेडणेकर म्हणाल्या.
शाळा बंद आणि बार सुरू..
म्हणजे या महाभकास आघाडी सरकारला "क्लास पेक्षा ग्लास" महत्त्वाचा वाटतो…
वाह रे वाह ठाकरे सरकार…
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) January 8, 2022
दरम्यान, याविषयी ट्विट करत सदाभाऊ खोत म्हणाले आहेत की,’शाळा बंद आणि बार सुरू म्हणजे या महाभकास आघाडी सरकारला “क्लास पेक्षा ग्लास” महत्त्वाचा वाटतो.वाह रे वाह ठाकरे सरकार’, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गुगलकडून देशातील पहिल्या मुस्लिम शिक्षिकेला अभिवादन; जाणून घ्या कोण होत्या फातिमा शेख
- “किरीट सोमय्या हळूच कुठलीतरी गोळी खातात, ती फस्ट्रेशनची आहे का?”, किशोरी पेडणेकरांचा सवाल
- सावधान! आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिश्रण असलेला ‘डेल्टाक्रॉन’ आलाय
- गोव्यात काँग्रेसच्या सक्षम नेतृत्वाअभावी १७ चे २ आमदार झाले-संजय राऊत
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय ते आम्ही यापूर्वीच केलेले”, ममतांचे मोदींसमोरच विधान
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<