मुंबई : राज्यातील १२ भाजप आमदारांच्या निलंबनाबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या सर्व १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. एकीकडे भाजपकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारसाठी धक्का असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा(JP Nadda) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात जे.पी.नड्डा यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारची लोकशाहीविरोधी कामे थांबवणे हा सत्याचा विजय आहे. मी सर्व १२ आमदारांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्र सरकारच्या असंवैधानिक कारभाराविरोधात भाजप आवाज उठवत राहील. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी वर्गाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत. भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या अंतर्गत जनतेच्या हक्कांसाठी भाजप नेहमीच लढत आहे’, असे नड्डा म्हणाले.
महा विकास अघाड़ी सरकार के संविधान और लोकतंत्र के विरुद्ध कार्यों को माननीय सुप्रीम कोर्ट द्वारा रोका जाना, सत्य की विजय है। मैं सभी 12 विधायकों को बधाई देता हूँ। भाजपा, महाराष्ट्र सरकार की गैर संवैधानिक गतिविधियों के खिलाफ निरंतर आवाज उठाती रहेगी।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) January 28, 2022
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याने तसेच शिवीगाळ केल्याने आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणीया १२ आमदारांचे (suspension of 12 BJP MLAs) ५ जुलै २०२१ रोजी निलंबन करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या:
-
“बहुमताच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम…”, ‘त्या’ निर्णयावरून दरेकरांचे टीकास्त्र
-
भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर संजय राऊत म्हणाले…
-
“तीन चाकी सरकारनं कायद्यात राहून राज्य करावं”, आ. कीर्तीकुमार भांगडिया
-
“महाभकास आघाडी सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा ‘हा’ निर्णय”, भातखळकरांचे टीकास्त्र
-
“हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या?”, ‘त्या’ निर्णयावरून चित्रा वाघ यांचा टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<