मुंबई : १४ मे ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत भाजपाचं हिंदुत्व नकली असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी त्यांनी सभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर अनेक आरोप केले. या आरोपाला भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर मिळाले. आता या सभेवरच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
“महाराष्ट्राचे सुसंस्कृत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुन्नाभाई म्हणतात. मुख्यमंत्र्यांना जाहिरातबाजी करुन सभा घ्यावी लागली. बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे असूनही मला मुख्यमंत्री केलं. तुम्ही १० वर्ष मुख्यमंत्री राहिलात तरी माझ्या ८ महिन्यांच्या कामाची बरोबरी करु शकणार नाही. शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क अभियान होते”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
तसेच पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, “२५ वर्षांपेक्षा जास्त काळ युती केली आणि मुख्यमंत्रिपदासाठी गद्दारी केलीत, अडीच वर्षात तुम्ही काय काम केलं नाही. मंत्रालयात जायचं नाही, व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे भाषण, असं काम सुरु असल्याचा आरोप राणे यांनी केला. शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्र उभा राहिला. तुम्ही त्यांचं नाव घेऊ शकत नाही”. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करा असं आवाहन केलं होतं. मात्र, राज्य सरकारनं केलं नाही. विकास कामांवर कसा पैसा खर्च करणार हे कळत नाही, असा आरोप देखील नारायण राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –