Shambhuraj Desai | महाराष्ट्र एकीकरण समितीने मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर घोषणाबाजी केली आहे. एकीकरण समितीने देसाई यांना विविध मागण्यांचे निवेदन देखील दीले आहे. हिवाळी अधिवेशन संपताच बेळगावात जाऊन चर्चा करू आणि न तनाव वाढता वाटाघाटीतून प्रश्न सोडवू, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
सीमेबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे आजकाल बरेच राजकारणही होत आहे. यापूर्वी शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव दौरा रद्द केला होता. कर्नाटक सरकारने मंत्र्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला होता. पण कर्नाटक सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत त्यांना बेळगावी जाण्यास नकार दिला होता.
खरं तर, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की जर महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावीला भेट दिली तर सरकार त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नका. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला होता. दरम्यान, हिवाळी अधिवेशन संपताच बेळगावात जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ ते ३० डिसेंबर या काळात नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. अधिवेशनात सीमाप्रश्नावरून काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole | “भाजपाचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”; नाना पटोलेंचा घणाघात
- Bacchu Kadu | महापुरुषांबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिला पाहिजे – बच्चू कडू
- Gulabrao Patil | “ताई कशी काय बोलते गं, थोडी लाज…”; गुलाबराव पाटलांची सुषमा अंधारेंवर टीका
- Sharad Pawar | “उदयनराजेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल समाधान, पण…”; शरद पवार नेमकं काय म्हणाले?
- Sanjay Raut | संजय राऊतांना एकनाथ शिंदेंच्या द्वेषाचा कावीळ ; शिंदे गटाची खोचक टीका