Share

Shambhuraj Desai | हिवाळी अधिवेशन संपताच बेळगावात जाऊन चर्चा करु – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai | महाराष्ट्र एकीकरण समितीने मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर घोषणाबाजी केली आहे. एकीकरण समितीने देसाई यांना विविध मागण्यांचे निवेदन देखील दीले आहे. हिवाळी अधिवेशन संपताच बेळगावात जाऊन चर्चा करू आणि न तनाव वाढता वाटाघाटीतून प्रश्न सोडवू, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

सीमेबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे आजकाल बरेच राजकारणही होत आहे. यापूर्वी शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव दौरा रद्द केला होता. कर्नाटक सरकारने मंत्र्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला होता. पण कर्नाटक सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत त्यांना बेळगावी जाण्यास नकार दिला होता.

खरं तर, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की जर महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावीला भेट दिली तर सरकार त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नका. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला होता. दरम्यान, हिवाळी अधिवेशन संपताच बेळगावात जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ ते ३० डिसेंबर या काळात नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. अधिवेशनात सीमाप्रश्नावरून काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Shambhuraj Desai | महाराष्ट्र एकीकरण समितीने मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर घोषणाबाजी केली आहे. एकीकरण समितीने देसाई यांना विविध मागण्यांचे निवेदन …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now