IND VS PAK | T20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या पहिल्या सामन्यात, भारताने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 31 धावांत 4 मोठ्या विकेट्स गमावल्या. यानंतर कोहली आणि हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. यासह संघाने गतवर्षी विश्वचषकात 10 विकेट गमावल्याचा बदलाही घेतला आहे. याआधी पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद आणि शान मसूद यांनी अर्धशतके झळकावली. कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले.
संपूर्ण देश उद्या दिवाळी साजरी करत आहे. पाकिस्तानला हरवत भारतीय संघाने देशाला दिवाळी गिफ्ट दिले. पाकिस्तानवर विजय मिळाल्यानंतर अनेक भावनिक क्षण पाहायला मिळाले. विराटबरोबर चागंली भागीदारी केलाला हार्दिक पांड्या मैदानावर भावनिक झाला. यावेळी हार्दिक पांड्याला अश्रू अनावर झाले.
काय म्हणाला हार्दिक पांड्या ?
पांड्या आपल्या वडिलांच्या बलिदानाची आठवण करून भावूक झाला. हार्दिक पांड्या म्हणाला, “माझ्या वडिलांनी खूप त्याग केला आहे. फक्त मुलांसाठी एका शहरातून आपलं सगळं विकून दुसऱ्या शहरात येणं. मी हे करूच शकत नाही. मी माझ्या मुलावर खूप प्रेम करतो. त्याच्यासाठी सर्व काही करेन. मात्र माझ्या वडिलांनी दोन्ही मुलं 6 वर्षाची असताना सगळं सोडून येणं हा खूप मोठा त्याग आहे. मी कायम त्यांचा ऋणी राहीन.”
तो म्हणाला, “आशिया कपमधील पराभवानंतर टीम इंडियावर बरीच टीका झाली. खेळाडूंना या गोष्टी खूप आवडल्या. तेव्हा आम्ही ठरवले होते की पराभव डंक मारतो, चला डंख मारू या, आम्हाला आमच्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे, ते म्हणजे T20 विश्वचषक. प्रत्येक खेळाडूने एकमेकांना साथ दिली. नुकसानीसाठी आम्ही कोणा एका व्यक्तीला दोष दिला असे नाही. आम्ही एकत्र हरू आणि एकत्र जिंकू.”
Hardik Pandya got emotional during the interview – this victory means alot! pic.twitter.com/rf1IFdKrwv
— THEVALUEINVEST™ (@the_valueinvest) October 23, 2022
हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास –
हार्दिक टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा आणि 50 बळी घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. हार्दिकने सुरुवातीला गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी करत चार षटकात केवळ 30 धावा दिल्या आणि नंतर तीन मोठ्या विकेट घेतल्या. यामध्ये त्याने शादाब खान, हैदर अली आणि नंतर मोहम्मद नवाज यांची विकेट घेतली. त्यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू फलंदाजीत आला आणि त्याने विराटसोबत जबरदस्त भागीदारी केली.
भारताची फलंदाजी –
नसीम शाहने भारतीय संघाला पहिला धक्का दिला आहे. केएल राहुल त्याच्या बॉलवर 4 धावा काढून बोल्ड झाला. त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. भारतीय संघाला दुसरा धक्का कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने बसला आहे. रोहित शर्माला इफ्तिखार अहमदने हारिस रौफच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद केले. सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर त्याने 10 चेंडूत 15 धावा केल्या आणि मोहम्मद रिझवानकडे हरिस रौफकडे झेलबाद झाला. त्यानंतर अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र तो फार काही करु शकला नाहीत. पटेल अवघ्या 2 धावा करून धावबाद झाला. नंतर हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी मैदानात उतरला. हार्दिक पांड्याच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला. पंड्या 40 धावा करून मोहम्मद नवाजच्या चेंडूवर बाबर आझमकरवी झेलबाद झाला. दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा भारताला विजयासाठी 5 चेंडूत 15 धावांची गरज होती. विराट कोहलीने 20व्या षटकात मोहम्मद नवाजच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला. भारताला आता विजयासाठी 3 चेंडूत 6 धावांची गरज आहे.
शेवटच्या षटकातील थरार-
भारताला 6 चेंडूत 16 धावा करायच्या होत्या. हे षटक डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजने टाकले. पंड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने 37 चेंडूत 40 धावा केल्या. एक चौकार आणि दोन षटकार मारले. दुसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने धाव घेतली. कोहलीने तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर षटकार मारला. तोही नोबॉल होता. आता 3 चेंडूत 6 धावा हव्या होत्या. चौथ्या चेंडूवर कोहली बोल्ड झाला, पण फ्री हिटमुळे तो आऊट झाला नाही. 3 धावाही मिळाल्या. आता 2 चेंडूत 2 धावा करायच्या होत्या. कार्तिक 5 व्या चेंडूवर यष्टिचित झाला. त्याने 2 चेंडूत एक धाव घेतली. आता एका चेंडूवर 2 धावा हव्या होत्या. नवाजने पुढचा चेंडू वाईड दिला. अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत संघाला विजय मिळवून दिला.
शेवटच्या षटकात पाकिस्तान संघ चांगलाच कावरा-बावरा झाला होता. नो बॉल आणि वाईड गेल्यानंतर पाकिस्तानी खेळाडून पंचांवर दबाव आणत होते. मात्र नशिबाला सुद्धा पाकिस्तान जिंकणे मान्य नव्हते. त्यामुळे शेवटल्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताचा विजय झाला.
अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने पाकिस्तानी फलंदाजी केली उद्ध्वस्त
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी पाकिस्तानच्या फलंदाजीला पूर्णपणे हादरा दिला आहे. सिंगने जहान ग्रीन संघाचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसह तीन विकेट घेतल्या. त्याचबरोबर पंड्यानने पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. तर शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या :
- IND VS PAK | ते शेवटचे थरारक षटक, पाकिस्तान संघ कावरा-बावरा ; वाचा नेमकं काय घडलं
- IND VS PAK । भारताची ऑस्ट्रेलियात ‘विराट’ दिवाळी; पाकिस्तानला धो-धो धुतले
- Health Care Tips | तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जळजळ होत असेल तर, ‘हे’ उपाय करून बघा
- IND VS PAK | कोहली-हार्दिकने दिवाळी साजरी केली, पाकिस्तानला लोळवले ; 4 विकेट राखून विजय
- Travel Guide | ‘या’ ठिकाणांना भेट देऊन आपल्या जोडीदारासह दिवाळीच्या सुट्ट्यांचा घ्या आनंद