हिंगोली:- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.
काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत नामांतराला तीव्र विरोध केला आहे. तर, दुसरीकडं CMO अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शासन निर्णय वा इतर माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगपाखड केली होती.
दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर होणारच, शिवसेनेमध्ये शिवसेनाप्रमुखांचा आदेश हा अंतिम असतो. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर यापुर्वीच केले आहे. त्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्कामोर्तब करतील. त्यामुळे यात आता कुणालाही वाटा किवा फाटा मारता येणार नाही. काॅंग्रेसचा या नामांतरला विरोध असला तरी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असा दावा राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “CAA, NRC, राम मंदिर उभारलं जात असल्याचं दुख: असल्याने कृषी कायद्याला विरोध होत आहे”
- ग्रामपंचायत निवडणुकीचा सोशल मीडियावर धुरळा
- शंभर कोटी रुपयांच्या निधीतून झालेले रस्ते निकृष्ट, अतुल सावे यांची तक्रार
- अनुष्काची सिक्युरिटी वाढवली; घरच्यांना देखील भेटता येणार नाही…
- ‘पुरुष नेत्याच्या संपर्कात असलेल्याच महिलेला निवडणुकीचं तिकीट दिलं जातं’