नवी-दिल्ली : शुक्रवारी(१० डिसें.)एससीएल इंडिया २०२१ परिषदेला संबोधित करतांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी देशातील जास्तीत जास्त सरकारी प्रकल्पांना कोणत्या कारणांमुळे विलंब होत आहे यासंदर्भात भाष्य केले आहे.
यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले की,’मला कोणावरही आरोप करायचे नाहीत, पण व्यवस्थेमुळे जास्तीत जास्त प्रकल्पांना विलंब होत आहे. मात्र व्यवस्थेमुळे जास्तीत जास्त प्रकल्पांना विलंब होत आहे. सरकारी यंत्रणेत निर्णय न घेणे आणि निर्णयांना उशीर होणे ही मोठी समस्या होती.’
I don't want to make any type of allegations against anybody but the maximum projects are delayed because of the system. In the govt system, not taking decisions & making delays for the decision was a big problem: Union Minister Nitin Gadkari at SCL India 2021 conference (10.12) pic.twitter.com/mdwEqgj9bU
— ANI (@ANI) December 10, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’सर्वत्र निर्णय घेण्यास एवढा विलंब होतो की त्यामुळे प्रकल्पांची किंमत वाढते. आम्हा सर्वांना माहित आहे की बांधकाम हे भारतातील एक प्रमुख रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. शेतीनंतर, आपल्या जीडीपीमध्ये योगदानाच्या बाबतीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहे.’तसेच पंतप्रधानांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. देशाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित समस्या सोडवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत असून प्रत्यक्षातले चित्र भेसूर’
- ३७८ दिवस अशा पद्धतीने चाललेला लढा जगात दुसरा झाला नसेल- संजय राऊत
- गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू- नवाब मलिक
- ‘मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी,दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे’
- भाजपने ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची केली मागणी