मुंबई : राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा संपण्याचे नाव घेत नाही आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मनसेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच भोंग्यावरील भूमिकेचा सर्वात मोठा फटका हिंदू मंदिरांना बसल्याचेही ते म्हणाले.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘भोंग्यांसंदर्भात देशात नक्कीच एक धोरण असायला हवं असं आम्ही आधीही म्हटलं आहे. तसेच गृहमंत्र्यांनी देखील याविषयी राष्ट्रीय धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे. यात जाती-धर्माचा प्रश्न येत नाही. परंतु, ज्यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘या सर्व गोष्टींचा सर्वात मोठा झटका भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला आहे. खरंतर त्यांना हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली निर्माण करायच्या आहेत. सुदैवाने महाराष्ट्रात असं काही होऊ शकलं नाही.’
महत्वाच्या बातम्या:
- पराभवानंतर पुन्हा रामदास आठवले यांची शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा !
- “…हे देखील भोंग्यांवरून जाहीर करा”, जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र
- राज ठाकरेंच्या भूमिकेवर सर्वात जास्त हिंदू समाज नाराज – संजय राऊत
- शिवसेनेचे हिटमॅन..! रोहित शर्मासारखा संजय राऊतांनी खेळला Pull Shot; पाहा VIDEO
- “हिंदू समाजातच फूट पाडून…”, भोंग्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची मनसेवर टीका