Bhagat Singh Koshyari | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. गेले अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यात आता आणखीन वाढ झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले होत.
यावेळी कोश्यारी म्हणाले कि, महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रसत्त वक्तव्य त्यांनी केले होत. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे.
राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर आज दिवसभर राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी राज्यलांच्या वक्तव्याचा निषेद केला तसेच मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली. यानंतर या घडामोडींवर आता स्वतः कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले कि, मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसेच मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता.
केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde । “राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, त्यामुळे त्यांनी…”; मुख्यमंत्री शिंदेंचा सल्ला
- Udhdav Thackeray : “…हे मान्य केल्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देईन”, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!
- Devendra Fadnavis । राज्यपालांच्या विधानाशी भाजप सहमत नाही – देवेंद्र फडणवीस
- Sandeep Deshpande | ज्या गोष्टी माहित नाहीत, त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये – संदीप देशपांडे
- Uddhav Thackeray | “…तर ते कोश्यारी नावाचं पार्सल तुरुंगात पाठवा – उद्धव ठाकरे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<