धुळे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याने राज्यभरात मोठा गदारोळ माजला आहे. विविध क्षेत्रांतून त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. मुंबईतून गुजराती, राजस्थानी निघून गेले, तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. या विधानाशी आपण सहमत नसल्याची भूमिका भाजपाने घेतलेली दिसून येते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावर आता स्पष्टीकरण दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपण कोश्यारींच्या विधानाशी सहमत नसल्याचं सांगितलं आहे. तसंच राज्यपालांचं विधान म्हणजे अतिशयोक्ती अलंकार असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं कार्य, त्याचं श्रेय हे सर्वाधिक आहे. उद्योग क्षेत्रामध्ये मराठी माणसाने जी प्रगती केली, त्यामुळे त्याचं जगभरात नाव झालंय. विविध समाजांचं योगदान नाकारता येणार नाही. पण मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूस, मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक यांचा सहभाग सर्वाधिक आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | “राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंतःकरण याच्यात काही फरक नाही”; शरद पवारांची जहरी टीका
- Sushma Andhare | राज्यपालांवर राज्यापेक्षाही भाजपला सांभाळण्याचीच जबाबदारी जास्त- सुषमा अंधारे
- Supriya Sule | बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा – सुप्रिया सुळे
- Rupali patil | भगतसिंह कोश्यारी चले जाओ- रूपाली पाटील-ठोंबरे
- Eknath shinde | “मी मुलाखत दिली तर राज्यात भूकंप होईल”; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<