मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधत भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
भाजपचा वंश कुठून सुरू होतो हे पाहावे लागेल. दिवस सारखे राहत नाहीत. दिवस येतात आणि जातात. काळ सारखाच राहत नाही. नंतर जे लोक येतील ते तुमच्यासारखेच वागले तर काय होईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची, हिंदूत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची, राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचं कारस्थान असल्याचा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “आमची वेळ येईल तेव्हा…” राऊतांच्या अटकेवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Uddhav Thackeray । भाजपचा वंश तरी नेमका कोणता? नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा पलटवार
- Sanjay Raut | मोठी बातमी! संजय राऊत यांना ४ दिवसाची ईडी कोठडी
- Aaditya Thackeray | दोन लोकांच्या जम्बो मंत्रिमंडळात मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण तेच समजत नाहीये – आदित्य ठाकरे
- Aaditya Thackeray : चाळीसच्या चाळीस आमदारांनी राजीनामा द्यावा, बघू सत्य जिंकते की सत्ता; आदित्य ठाकरेंचं पुन्हा आव्हान
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<