मुंबई- कंगना राणावतच्या घरावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार चपराक लगावली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा बोलविता धनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते, त्यामुळे ‘उखाड दिया’ म्हणणाऱ्यांनाच उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे ‘उखाड दिया हैं’ अशी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
अगोदर अर्णब गोस्वामी आणि आता कंगना राणावत यांच्या प्रकरणात न्यायालयाकडून आलेल्या निर्णयामुळे ठाकरे सरकार किती सूडबुद्धीने काम करीत आहे या वर शिक्कामोर्तब झाला आहे. आपला अहंकार जपण्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई घडवून आणली असून कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई आणि वकिलांना दिलेली करोडो रुपयांची फी उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी अशी आग्रही मागणी सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.
सरकारच्या विरोधात टीका करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, मारहाण करणे, जेल मध्ये टाकणे व या ना त्या मार्गाने लोकांचा आवाज दडपण्याचेच काम हे ठाकरे सरकार करत असून ठाकरे सरकारकडून राज्यात छुपी आणीबाणी लागू केली गेली असल्याचा आरोप सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अर्नब गोस्वामी यांना मुख्यमंत्र्यांनी मुलाखत द्यायला हवी होती,तो खरा धमाका ठरला असता’
- अर्णबचा जामीन वाढवत सर्वोच्च न्यायालयाने देखील सरकारला झापलं!
- ‘एखाद्यानं मूर्खपणा केला म्हणून प्रशासन आणि सरकार कायद्याची चौकट मोडू शकत नाही’
- ठाकरे सरकारचे तोंड काळं झालं; हायकोर्टाच्या निकालावरून भाजपची टीका
- ‘धनगर आरक्षणप्रश्नी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारला शून्य गुण’