Sanjay Raut। मुंबई : काल शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानंतर पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती.
ते म्हणाले कि, काल राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली वारीवर येणार होते. स्वारीवर नाही.गेल्या महिन्याभरातली त्यांची ही ५वी दिल्ली भेट आहे, असा टोला राऊतांनी लगावला. तसेच यावेळी पुढे पत्रकार परिषदेत बोलताना राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन होऊ शकतं. पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे मोठे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तर यानंतर राऊतांच्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलाय.
एकनाथ शिंदे म्हणाले कि, ‘त्यांना स्वप्नात राहू द्या, ते स्वप्न पाहत असतात. त्यांना स्वप्न पाहू द्या. राज्यात 166 आमदारांचं सरकार आहे. लोकसभेतही 12 आमदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. राज्यात आणि केंद्रातही पक्षाकडे बहुमत आहे. सरकार पूर्णपणे मजबूत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या, असा जोरदार टोला शिंदेंनी राऊतांना लगावलाय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच ते आज माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची देखील भेट घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath shinde vs Sanjay Raut | “त्यांना स्वप्न पाहू द्या”; एकनाथ शिंदेंचा राऊतांना टोला
- Sanjay Raut | महाराष्ट्राच्या राजकारणात ३ महिन्यापासून खेळ खंडोबा सुरू – संजय राऊत
- Amit Shah and Eknath Shinde : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय अमित शाह घेणार?
- Sanjay Raut | “महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होईल” ; संजय राऊतांचे मोठे विधान
- Amol Mitkari | शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही – अमोल मिटकरी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<