टीम महाराष्ट्र देशा: टी20 विश्व कप T20 World Cup दरम्यान बीसीसीआय BCCI ने महिला क्रिकेट खेळाडूंना Women Cricket खुशखबर दिली आहे. भारतीय पुरुष क्रिकेट खेळाडूंप्रमाणे आता भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनाही मानधन मिळणार आहे. आतापर्यंत पुरुषांना महिलांपेक्षा जास्त मानधन मिळत होते पण मात्र आत्ता जाहीर झालेल्या निर्णयानुसार पुरुषांना आणि महिलांना समान मानधन मिळणार असून बीसीसीआयने हे अंतर कमी केले आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण आता लैंगिक समानतेच्या नव्या युगात प्रवेश करत आहोत. दरम्यान पुरुष आणि महिलांना समान अधिकार दिले जातात तर यापुढे महिला आणि पुरुष खेळाडूंना समान मानधन दिले जाईल.
I’m pleased to announce @BCCI’s first step towards tackling discrimination. We are implementing pay equity policy for our contracted @BCCIWomen cricketers. The match fee for both Men and Women Cricketers will be same as we move into a new era of gender equality in 🇮🇳 Cricket. pic.twitter.com/xJLn1hCAtl
— Jay Shah (@JayShah) October 27, 2022
पुरुष क्रिकेट खेळाडूंप्रमाणे महिला क्रिकेट खेळाडूंना मिळणार मानधन
भारतीय पुरुष क्रिकेट संघाला कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यासाठी प्रत्येकी 15 लाख रुपये मानधन दिले जाते. तर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी पुरुषांना प्रत्येकी 6 लाख रुपये दिले जातात. तर, टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी पुरुष खेळाडूंना प्रत्येकी 3 लाख रुपये दिले जाते. महिला क्रिकेट खेळाडूंना आधी यापेक्षा कमी मानधन दिले जायचे. पण बीसीसीआय ने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता महिलांना सुद्धा पुरुष खेळाडू प्रमाणे प्रत्येकी एवढे मानधन दिले जाईल.
आत्तापर्यंत महिला क्रिकेट खेळाडूंना Women Cricket Player मिळणारे मानधन
यापूर्वी महिला क्रिकेट खेळाडूंना प्रतिदिन सुमारे 20,000 रुपये प्रत्येकी मॅच मानधन दिले जात होते. या मानधनाची रक्कम भारतीय पुरुष संघाच्या 19 वर्षाखालील खेळाडूंच्या बरोबरीची होती. पण आता हे अंतर संपलेले असून महिला क्रिकेट खेळाडूंना देखील पुरुष क्रिकेट खेळाडूंनी एवढीच मानधन दिले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | C-295 प्रकल्पावरून ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर हल्ला, म्हणाले…
- Karuna Munde | अजित पवार आणि फडणवीसांच्या शपथविधीचे प्लॅनिंग धनंजय मुडेंनी केले – करुणा मुंडे
- Uday Samant | “C-295 प्रकल्प वर्षभरापूर्वीच…”; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
- Breaking News | महाराष्ट्रात होणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला, 22 हजार कोटींचा C-295 प्रकल्प वडोदऱ्यात
- Uddhav Thackeray | अब्दुल सत्तारांच्या ‘दारू पिता का?’ प्रश्नावरून ठाकरे गटाची सत्तारांवर टीका, म्हणाले…