मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राजकीय वर्तुळातून सकाळपासूनच अनेक प्रतिक्रिया येत आहेत. प्रामुख्याने भाजप नेते आणि शिंदे गटातील नेते या मुलाखतीवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळे आहे “, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“शिवसेना जेव्हा आमच्यासोबत होती. तेव्हाही आम्हाला इशारे देत होते. आता त्यांच्याच शिवसैनिकांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं तरी देखील ते भाजपलाच इशारे देत आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व फक्त भाजपमुळेच आहे. भाजपबद्दल बोलणं, भाजपला टोमणे मारणं, हे सगळं केलं तरच महाराष्ट्रात शिवसेनेला स्थान मिळेल, अशी परिस्थिती आहे. त्यांची हि वाईट खोड जाणार नाही”, असे आशिष शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Shahjibapu Patil : उद्धव ठाकरे आजारी होते तर एकनाथ शिंदेंना चार्ज द्यायचा होता – शहाजीबापू पाटील
- Virat Kohli : विराट कोहलीकडे अजूनही ३० ते ३५ शतकं ठोकण्याची क्षमता – रॉबिन उथप्पा
- Baba Ramdev | रामदेव बाबांनी सुरु केली कावड सेवा; नेटकरी करतायेत ट्रोल
- Narayan Rane : उद्धव ठाकरेंना मी जवळून ओळखतो, त्यांच्या अंगात खोटारडेपणा, कपटीपणा – नारायण राणे
- Ashish Jaiswal : शिंदे-फडणवीसांची जोडी तेंडुलकर-कांबळी यांच्यासारखी; आशीष जैस्वालांचे वक्तव्य!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<