लातूर : जिल्ह्यातील 785 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रशासन विभागाच्या वतीने जाहिर करण्यात आला आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले होते.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल 18 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यानंतर सर्व विजयी उमेदवारांच्या नजरा आरक्षण सोडतीवर लागल्या आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी संध्याकाळी सरपंचपद सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला. लातुर, औसा, रेणापूर. निलंगा, शिरूर, अनंतपाळ, उदगीर, जळकोट, चाकूर, अहमदपुर या नऊ तालुक्याची सोडत 29 जानेवारी रोजी तर देवणी तालुक्याची सोडत 1 फेब्रूवारी रोजी होणार आहे.
29 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर, चाकूर, तालुक्यांची सोडत जाहिर होईल. तर दुपारी 3 वाजता रेणापुर, शिरूर, अनंतपाळ आणि जळकोट तालुक्याची सोडत काढली जाणार आहे. देवणी तालुक्यात रोजी सकाळी 10.30 वाजता जाहीर केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हिंदुत्व हे बाळासाहेबांचंच पण शिवसेना हे हिंदुत्व आता विसरली – प्रसाद लाड
- अधिकाऱ्यांच्या लसीकरणानंतर शंका-कुशंका झाल्या दूर
- देवमाणसातील राक्षस; मुलगा न झाल्याने डॉक्टरकडून पत्नीसह मुलीला मारण्याचा प्रयत्न
- जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले आहेत; पडळकरांची खोचक टीका
- ‘या’ खेळाडूला KKR संघातून करारमुक्त करायला हवे होते’ गंभीरने व्यक्त केलं स्पष्ट मत !