मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगीरी केली आहे. टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ४ कांस्य, २ रौप्य आणि १ सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने आतापर्यंत इतके पदक यापुर्वी कधीच जिंकले नव्हते. यापुर्वी भारताने २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सहा पदकांची कमाई केली होती.
टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेतील यशाचे संपुर्ण श्रेय हे मोदी सरकारला जाते असे वक्तव्य माजी महिला खेळाडू अंजु बॉबी जॉर्ज यांनी केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या बोलत होत्या. मोदी सरकार खेळांडुना प्राथमिकता देत आहे. पदक जिंकल्यानंतर थेट पंतप्रधान त्यांना फोन करुन त्यांचे अभिनंदन करतात, असे म्हणाली. यावेळी बोलताना अंजु बॉबी जॉर्जने तिचा अनुभव सांगितला. ती म्हणाली,’आमच्यावेळी क्रीडामंत्री ऑलिम्पिक विलेजला भेट द्यायचे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही माझे अभिनंदन केले होते.’ असे तीने सांगितले.
यावेळी पुढे बोलताना ती म्हणाली,’जेव्हा मी वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकले होते तेव्हा भारतात खुप मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र मत्रांलयाकडून काही खास घडले नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अभिनंदन केले होते. बस्स एवढचं. मात्र आता पंतप्रधान खेळाडूंशी संवाद साधणार आहे. त्यांना पराभवानंतरही फोन करतात. त्यांना पाठबळ देत आहे. यापुर्वी हे कधीच घडलं नव्हतं.’ असे ती म्हणाली. अंजु बॉबी जॉर्जने २००३ साली झालेल्या जागतीक अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- नीरजच्या यशानंतर मिल्खा सिंग यांच्या मुलाने व्यक्त केली भावना, म्हणाला…
- ‘ख्वाहिश आपको सोने ना दे’ ; नीरज चोप्रानं ४ वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट होतयं व्हायरल
- ‘मोदींना भाजप विचारसरणीचे न्यायाधीश पाहिजे’, पी.चिदंबरम यांची टीका
- आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
- आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने बायोबबलचे नियम केले कठोर, उल्लंघन झाल्यास कुटुंबावरही होणार कारवाई
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<