Aditya Thackeray | मुंबई : जुलैमध्ये झालेल्या राजकीय नाटकानंतर राज्यात सत्तांतर झाली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसतात. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या बंड मध्ये सहभागी असलेल्या आमदरांना खोके आमदार असं देखील संबोधित करण्यात आलं असून खोके सरकार, असा नारा देखील विरोधकांनी लावला होता. अशातच शिवसेना उद्धब बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया-
आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा खोक्यावरून शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. खोके कोणाकडे किती पोहोचले यावरून दोन – तीन आमदारांमध्ये आता भांडण सुरू झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. चाळीस गद्दार गेले मात्र नवे सहकारी आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे समाधान वाटत असून, त्यांना घेऊन आम्ही पुढे जात असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
तसेच पुढे ठाकरे म्हणाले कि, हे सरकार अजून राजकारणातच अडकलं आहे, घटनाबाह्य सरकारने कामही करायची असतात, हे त्यांना अजून जाणवले नाही. राज्यात केवळ आश्वासनांवर आश्वासने आणि घोषणांवर घोषणा देणे सुरू आहे, जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही, त्यामुळे या सरकारला ‘घोषणा सरकार’, ‘खोके सरकार’ अशी अनेक नावे मिळाली आहेत. आपण काम करणे गरजेचे आहे, हेही ते विसरून गेले आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bachhu Kadu । “ते बोलण्याची त्यांची कुवत नाही आणि ताकदही”; बच्चू कडूंचा रवी राणांवर पलटवार
- Nilesh Lanke । “राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादीचेच, कोण होणार ते…”; निलेश लंकेंचं मोठं वक्तव्यं
- NCP | “दोन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार पडणार अन् सत्तेत…”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा
- Shahajibapu Patil | “…तेव्हा शरद पवार कुठे होते?”, शहाजीबापू पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- Navneet Rana । “किशोरी पेडणेकर महापौर असताना किती खोके मातोश्रीवर…”; नवनीत राणांचे ठाकरेंवर गंभीर आरोप