मुंबई : महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला असून महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे.
आता याच मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांच्या आरोपानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मला कुणाशी वाद घालायचा नाही वा मला कोणाला दोष देखील द्यायचा नाही. महाराष्ट्र मोठे राज्य आहे येथे आठवड्याला 40 लाख वॅक्सिन लागतात त्यामुळे त्या दिल्या जाव्यात इतकीच आमची मागणी असल्याच राजेश टोपे म्हणाले आहेत.
Dear @CMOMaharashtra please get Pfizer, Moderna, Sputnik, J & J vaccines from abroad. Pls start a 1+1 campaign. All those who can afford the vaccine should pay for one person who can’t. The people of Maharashtra will support you to fight this pandemic. @AUThackeray @priyankac19
— Harneet Singh (@Harneetsin) April 8, 2021
दरम्यान स्क्रीनप्ले रायटर हरनीत सिंग या महिलेने ट्विटरवरुन महाराष्ट्राच्या परदेशातून लसींचा पुरवठा मागवण्यात यावा अशी विनंती केली. ‘मुख्यमंत्र्यांनी कृपया फायझर, मॉडर्ना, स्फुटनिक, जॉन्सन अॅण्ड जॉन्सच्या लसी परदेशामधून मागवाव्यात. एक अधिक एक मोहिमेअंतर्गत लसीकरण तातडीने सुरु कारावं. म्हणजेच जे लसीचे पैसे देऊ शकतात त्यांनी स्वत: लस विकत घेत एका गरजूच्या लसीचेही पैसे द्यावेत. महाराष्ट्रातील लोकं नक्कीच तुम्हाला या साथीच्या संकटाला तोंड देण्यासाठी मदत करतील,’ असं ट्विट हरनीत यांनी केलं.
Ma’am, we have requested the Union government for universal vaccination and more vaccination. All rules pertaining to vaccination are solely decided by the GoI.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 8, 2021
Yes. I understand you are following the protocol but it’s painful to see how our state is hurting. Hopefully GOI listens. 🙏🙏🙏
— Harneet Singh (@Harneetsin) April 8, 2021
यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी, ‘मॅडम, आम्ही केंद्र सरकारकडे जागतिक लसीकरण आणि अधिक लसीकरणाची मागणी केलीय. लसीकरणासंदर्भातील सर्व नियमांचे अधिकार केवळ भारत सरकारकडे आहेत,’ असं आदित्य यांनी म्हटलं आहे. त्यांनतर हरनीत यांनी रिप्लाय करत, ‘हो, मी समजू शकते की तुम्ही नियमांनुसार काम करताय. मात्र राज्याला होणारी हानी पाहून दु:ख होतंय. अपेक्षा आहे की केंद्र सरकार यासंदर्भात ऐकेल,’ असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोरोनामुक्त झाल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापटची पहिली पोस्ट, म्हणाली…
- उस्मानाबाद; त्रस्त शेतकऱ्यांनी फुकट वाटला भाजीपाला!
- लसीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, धनंजय मुंडेंचे आवाहन
- संजय राऊत विरोधात केंद्रीय महिला आयोगाला पत्र पाठवणार-चंद्रकांत पाटील
- निलेश राणे यांच्या सुचनेनंतर लांजा कोविड सेंटर सुरु करण्याला आला वेग