ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत सेनेचे 40 आमदार फोडले. त्यानंतर अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. या धक्क्यामुळे कोलमडलेली शिवसेना आता सावरण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेची मोट नव्याने बांधण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे आज शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने ठाण्यातील भिवंडी येथे आले होते. तेव्हा त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले कि, “ज्यांना आपण पुढे आणलं, ओळख दिली, मंत्रिपदं दिली. तेच आपल्याला सोडून गेले. काय कमी केलं आपण त्यांच्यासाठी? तरीही त्यांनी असं केलं, हे तुम्हाला तरी पटणारं आहे का?” तसेच त्यांनी तेथे उपस्थित युवा पिढीला असा सवालही केला कि, “सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, सर्कस सुरु आहे, ते राजकारण म्हणून, लोकशाही म्हणून तुम्हाला पटणारं आहे का?”. त्यावर उपस्थितांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.
महत्वाच्या बातम्या:
- Aaditya Thackeray : “गद्दार ते गद्दारच, त्यांच्या माथ्यावरून गद्दारीचा शिक्का…”; आदित्य ठाकरे आक्रमक
- Yashomati Thakur : जीव गेला तरी बेहत्तर, दडपशाही सहन करणार नाही – यशोमती ठाकूर
- IND vs ZIM : विराट कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यासाठी बीसीसीआय घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय; वाचा!
- Aarey Car Shed : आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का!
- County Cricket : चेतेश्वर पुजाराचा इंग्लंडमध्ये डंका, ३ द्विशतकं झळकावून मोडला ११८ वर्षांचा विक्रम
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<