नवी दिल्ली : ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा दौरा पंजाबमध्ये अडवण्यात आला होता. पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे प्रकरण त्यानंतर समोर आले होते. मोदींची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजप नेत्यांसह मोदींनी काँग्रेसवर आरोप केला होता. जीवीतास धोका असल्याचेही भाजप नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यावर आता देशभरातील काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.
मध्यप्रदेश काँग्रेसने पंतप्रधान मोदींना नाव न घेता टोला लगावला आहे. मध्यप्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन ‘भीत्रा व्यक्ती देशाचं नेतृत्व करु शकत नाही’, असे ट्विट करण्यात आले आहे.
ख़ौफ़ज़दा व्यक्ति देश का नेतृत्व नहीं कर सकता।
— MP Congress (@INCMP) January 8, 2022
या प्रकरणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना बघायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेले आहे. ७ जानेवारी रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली.
सुप्रीम कोर्टाने पंजाब आणि हरयाणाच्या उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांना पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्याचा रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधानांची सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, असं मत या प्रकरणात याचिका दाखल करणारे वकील मनिंदर सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाल्याचं सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलं आहे. तर पंजाब ही घटना खूपच गांभीर्याने घेत असल्याचं अॅटर्नी जनरल डी. एस. पटवलिया यांनी यावेळी सांगितलं.
यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतल्या त्रुटींना जबाबदार कोण हे शोधलं जाईल आणि असा निष्काळजीपणा सहन करता येणार नाही, असे अमित शहा म्हणाले. गृह मंत्रालयाने याबाबतचा सविस्तर अहवाल मागवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया;म्हणाले…
- पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत
- …त्यामुळे कॅ.अमरिंदर यांचा बार फुसका आहे हे समोर आले- संजय राऊत
- “पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…”
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघणाऱ्या मुर्दाड सरकारचा तीव्र निषेध’, भातखळकरांचा हल्लाबोल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<