PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्यात शेतकऱ्यांना 2 हजार ऐवजी 3 हजार रुपये मिळणार? पाहा अपडेट
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते.
अशात आत्तापर्यंत या योजनेचे (PM Kisan Yojana) 14 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहे. शेतकरी या योजनेतील 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. या योजनेतील पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळू शकतो, अशा चर्चा सुरू आहे.
An installment of two thousand rupees can be three thousand rupees
पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. या मदतीध्ये वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) सहा हाजारांऐवजी नऊ हजार रुपये दिले जाऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दोन हजार रुपयांचा हप्ता तीन हजार रुपये होऊ शकतो.
मात्र अद्याप सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, जमिनीची पडताळणी आणि आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे.
दरम्यान, देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे.
कोट्यावधी शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळवला आहे. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पीएम किसान पोर्टल वर जाऊन, यासाठी नोंदणी करू शकतात.
त्याचबरोबर या योजनेची संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकरी 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Govt Job Opportunity | आयकर विभागात नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर
- Chitra Wagh | महिलांचा अपमान करणाऱ्या नितीशकुमारांच्या गलिच्छ मनोवृत्तीचा निषेध – चित्रा वाघ
- Bacchu Kadu | अभ्यास असताना छगन भुजबळ मराठा आरक्षणावर असं बोलतात म्हणजे नवलच; बच्चू कडूंनी भुजबळांचे कान टोचले
- UPSC Recruitment | सरकारी नोकरीची संधी! UPSC मध्ये रिक्त पदांसाठी भरती सुरू
- Manoj Jarange | आम्ही ओबीसींच आरक्षण मागत नाही किंवा हिसकावून घेत नाहीये – मनोज जरांगे